Sunday, August 23, 2009

गोष्ट छोटी डोंगरा एवढी...............

नमस्कार मित्रानो ,

कालच हा चित्रपट पहिला .. खरच काळजाचा थरकाप उडवणारी हि कथा आहे .. शेतकर्याची कथा ..

कसा आमचा हा बळी राजा रोज मृत्युच्या दारात ढकलला जातोय ह्याचे खूप विदारक दृश्य ह्या चित्रपट मध्ये बघायला मिळते ..

त्यांचे प्रश्न कित्ती साधे आणि सोपे आहेत पण गेली साठ वर्षे आम्ही त्यांना काय देऊ शकलो ह्याचे दर्शन ह्या चित्रपट मध्ये होते ..

जग फार वेगाने धावत आहे .. पण आम्हीच ज्यांना मागे ठेवले आहे त्यांच्या मध्ये आणि आमच्या मध्ये जमीन आसमानीचा फरक आहे .. आम्हाला खाऊ घालणारच आज उपाशी आहे ..

एकीकडे महासत्ता होण्याची स्वप्ना पाहणाऱ्या आमच्या ह्या देशाचा राजा .. भिकेला लागायची वेळ आली आहे .. शाषण आणि प्रशासन मेलेल्या मुडद्या सारखे पडून आहेत ..

ह्याच चित्रपटातील शेवटचा एक वाक्य आहे जे तुमचे काळीज चिरून बरेच प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करून जातो ...

"एका किलो गव्हा साठी जेंव्हा सारा देश गहन ठेवावा लागेल न तेव्हाच माझ्या पिंडाला कावळा शिवेल "

खरच एका शेतकऱ्याच्या मनातले बोल काळजाचा ठाव घेतल्या खेरीज राहत नाहीत ...

प्रत्येक माणसाने .. ज्याला माणुसकीची कदर आहे आशाने .. आणि आमच्या शेतकर्यांच्या मुलांनी हा चित्रपट जरुर बघावा ..

शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्यावर जेवढ्या सहजतेने बोलता... त्याच मोठे पनाने हा चित्रपट एकदा तरी पाहावा .. तेव्हाच तुम्हाला आपल्या या कृषिप्रधान देशातील बळीराजाचे काय हाल चालले आहेत हे लक्षात येईल ......

एक चित्रपट म्हणून देखील आतिशय उच कोटीचा सिनेमा मराठी रंगभूमी वर आणल्या बद्दल मी सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो ...


जय महाराष्ट्र ......



No comments:

Post a Comment