महाराष्ट्रात मराठी नाही तर मग काय हिब्रीव मध्ये शपथ घेशील काय रे धस्कटा.....? आणि भारतात हिंदीत नाही तर मग काय जापनीज मध्ये शपथ घेशील?
हिंदीला मुळीच विरोध नाही ती तर अवघ्या देशाची भाषा; पण महाराष्ट्राला ही स्वतःची अशी एक भाषा आहे म्हटल, तिला 'मराठी' म्हणतात! आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोक हीच भाषा समजतात. सगळ्यानाच हिंदी येते असे नाही. कारण हिंदी येण्यासाठी शाळेत तर जावे लागते ना? सगळेच शाळेत गेल असते तर आमचा साक्षरता दर [लिटरसी दर] नसता का चांगला?
अरे महाराष्ट्रातील मुंबईच्या जनतेचे नेतृत्व तू करणार आणि मराठीत नाही बोलणार व्हयं रे? [हिंदीत बोल की नको बोलू, अरे पण मराठीत नाही बोलणार हा कसला हट्ट, थोबाड फोडलं असत जर मला ते जमल असत तर!]. का तू मुंबईला महाराष्ट्राची म्हणताच नाहीस? आता थांब, बघ तू आणि तुझ्या सारख्यांचे काय हाल होतात येणाऱ्या कोणत्या ही निवडणुकात ते! राष्ट्रीय पक्ष असो की मग प्रादेशिक, कुणीही मुंबईला आणि महाराष्ट्राला गृहीत धरलेलं सामान्य महाराष्ट्रीयन [मग तो आडनावाने बाहेरचा असो किंवा मग त्याच मूळ भारतातलं कुठलं ही असो, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आदर करतो आणि तिला आत्मसात करण्याचा थोडा तरी प्रयत्न करतो आणि कोणत्याही प्रकारच या राज्यच अहित चिंतत नाही तो आमच्यासाठी महाराष्ट्रीयनच] माणसाला चालणार नाही! अरे कसला माज रे ? गोर गरिबांची पैसे वाटून मत मिळवता येतात, हाच तुझा आणि तुझ्यासारख्या [इतर मराठी आणि अमराठी भाषिक] नेत्यांचा समज, दुर्दैवाने बराच खरा! पण बदल होतोय, तो तुला ही आणि सगळ्यांनाच दिसतोय.
तसं तर तमाम मराठी माणसाला माझ एक म्हणन आहे, आता या देशात एक नियमच काढूत ज्या क्षेत्रातून/प्रदेशातून उम्मेद्वारी घेताय तिथली भाषा तुम्हाला अवगत असलीच पाहिजे! का नको? कारण अखेर त्याच लोकांच नेतृत्व करायचं ना त्यांना, आणि त्यांची भाषाच येत नसेल तर काय डोमल प्रश्न सोडवणार? [आता कमीत कमी हे तर म्हणणार नाहीत ना की लोक प्रतिनिधी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी थोडेच असतात?] हा मुद्दा उचालावाच लागेल! ज्या लोकांचे तुम्ही नेतृत्व करता त्यांची भाषा यालाच हवी, म्हणजे तमिळनाडूत तमिळ, हरयाणा मध्ये हरयानवी, महाराष्ट्रात मराठी आणि याच प्रकारे प्रत्येक राज्यात, छोट्या छोट्या प्रदेशात त्यांची त्याची भाषा यालाच हवी. मग कशा जातील भाषा लोपाला! इकडं भाषेचे बारा तुम्हीच वाजवायचे आणि मग 'ही आणि ती भाषा संवर्धन समिती' काढून पैसा उकळायचा! काही मूर्ख म्हणत असतील अनेक भाषा केल्यातर प्रादेशिकता वाढेल, कशाला रे मग भाषावार प्रांत रचना केली? आणि मग हिंदी तरी का? आपण बोलुत की सगळेच इंग्रजी; लागेल थोडा वेळ पण होईल ना मग सारा 'भारत' - 'इंडिया'.
अरे अस्मितेचा प्रश्न मूळ असतो मग ती मराठी माणसाची असो की मग अमराठी माणसाची असो. एक लक्षात ठेव, विरोध कुणालाच नाही पण 'माझ्या' कशाला ही धक्का लावणार अशील आणि तो ही विरोधी भावनेने, तेंव्हा मग तू आणि मी!
अवघ्या भारताला परत एकदा विनंती करून सांगतो अरे कुणालाच विरोध नाही, पण माझं घर मला राहू द्या; नसता मग 'पाहुणे लाख पोसतो मराठी.....' आहेच की! एक सांगू मी ही एक भारतीय आहे, मला ही हिंदी भाषेचा तुझ्या पेक्षा जरा जास्त अभिमान आहे, कदाचित तुझ्यापेक्षा चंगली हिंदीही मला येते, तू तरी 'हिंदीचे डायलेक्ट' बोलतोस मी तर 'हिंदीच' बोलतो. आता तुला हिंदीचा इतका पुळका का तर योगा योगन तुझी भाषा हिंदी!
बघ महाराष्ट्र कळतोय का तुला , नसेल कळत तर घे गाठूड आणि जय महाराष्ट्र!
त्याच्या आधी मराठी माणसा तुला जगावं लागेल, आपलाच मुख्यमंत्री त्यांना मंत्री पद देतोच का? राज्यकर्ते बघा काही बोलता येते का तुम्हाला; की त्यासाठीही पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाची वाट बघताय? नका हो असं करू, नका आपली अस्मिता कुणाच्या पायावर टाकू, स्वाभिमानाचा बाळकडू पिलेला महाराष्ट्र, गटारातील घाण पिल्या सारख का वागतोय? आपण आता तरी जाग व्हायला पाहिजे, 'बघा काय करायचं' कुणाला काही सुचतंय का ते.....?
जय हिंद! जय महाराष्ट्र!
-एका मराठी माणसाकडून मराठीतून शपथ घेण्यास विरोधकरनारासाठी
टीप: सदर लेखक कुण्याही राजकीय संघटनेचा समर्थक वा सदस्य नाही. कुणाबद्दल काही अपशब्द निघालेच असतील तर तो भावनिक आवेश समजावा. लेखक एक अभिमानी भारतीय आणि महाराष्ट्रीयन आहे.
मंगळवार ३ नोव्हेंबर २००९
सोमवार २६ ऑक्टोबर २००९
'मुख्यमंत्री' आणि 'उप मुख्यमंत्री' यांचे 'मुख्यमंत्री कार्यकर्ता' तर्फे हार्दिक अभिनंदन
मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री कार्यकर्ता तर्फे हार्दिक अभिनंदन!
जय महाराष्ट्र.
मराठवाड्याचे भूमिपुत्र, आदरणीय शंकरराव चव्हाणांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात बहुजन विकासाचा ध्यास असलेले आणि आपले नवे उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा! तसेच या दोघांकडून ही महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंच जाईल ही अपेक्षा. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासाशी निगडीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रात महराष्ट्र आघाडीवर ठेवण्यासाठी अखिल महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे.
जय महाराष्ट्र.
प्रकाश पिंपळे आणि अमोल सुरोशे
www.jijau.com
आम्हाला हा महाराष्ट्र अपेक्षित आहे; वाचा महाराष्ट्र
गुरुवार २२ ऑक्टोबर २००९
सर्व निवडून 'दिल्या' गेलेल्या आमदारांचे हार्दिक अभिनंदन!
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल पाहता हे आता नक्की झाले आहे की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच पुन्हा सत्तेवर येणार आहेत. शिव सेनेची झालेली पीछेहाट एक राजकीय विशेष आहे आणि मनसे व भाजप ने केलेली कामगिरी या गोष्टी वाखाणन्या जोग्या आहेत. असो; एकंदर पुन्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीलाच सत्तेत ठेवण्याचे जनतेने ठरवले आणि इतरांना आपली इमेज पुन्हा बनवण्यासाठी, आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि विरोधक म्हणूनही व्यवस्थीत धोरणे राबवून घेता येतात हे दाखवण्यासाठी काही वर्ष वेळ दिला आहे. जे हरले त्यांनी कुठे न कुठे चूक केली; तुम्ही नापास झालात म्हणजे चूक उत्तर लिहिलं [जास्ती वेळेस] हे जितका पक्क असतं तितकच हेही आहे.
या निवडणुकीत काही जणांची स्तुती करावी अस ही वाटत आणि काही जणांच्या राजकीय धोरणांवर टीका करावी अस ही वाटत [तितके आम्ही मोठे नाहीत, पण आता नाही करणार तर कधी?]. शरद पवारांनी आपल्या राजकारणातील कौशल्याची चांगलीच चुणूक दाखवली [हे वाक्य बोलण्या इतपत आम्ही मोठे नाहीत, पण लेखाची मागणी म्हणून!]. येत्या निवडणुकीत एन.सी.पी ४ थ्या नंबर ला राहील असा गाजावाजा करणारांना हे छान उत्तर आहे! शरदा पवारांनी या वयात एका तरुणाला लाजवेल इतके काम केले. उमेदवारी देण्यापासून ते अगदी सभा घेणे आणि इतर राजकीय आराखडे बनवण्यात व्यक्तिगत लक्ष घातले. महाराष्ट्राला आणि सगळ्याच पक्षांना अशा धोरणी, समजूतदार, प्रगल्भ आणि अतिशय उत्साह असणाऱ्या कार्यकर्त्यांची/नेत्यांची गरज आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि महाराष्ट्राला त्याचं प्रगतीसाठीच मार्गदर्शन लाभत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
राज ठाकरेंनी ही छान कामगिरी केली. युवक आणि स्त्रीवर्ग यांच्या सदिच्छा मनसेच्या कमी आल्या आणि मुख्य म्हणजे राज ठाकरेंचे यासाठी अभिनंदन करावे की या दोन्ही वर्गांना त्यांनी या लोकशाही प्रक्रियेत सामावून घेतले. त्यांचे १३ 'शिलेदार' सरकारवर, त्यांच्या धोरणांवर अंकुश ठेवतील आणि महराष्ट्राच्या प्रगतीला एक वळण देतील हीच अपेक्षा. मनसे ला आमच्या हार्दिक शुभेच्छा.
खूप सारे, या ना त्या कारणाने झालेले बंडखोर निवडून आले, त्यांना ही वाखाणावे अशीच त्यांची कामगिरी; त्यांचे अभिनंदन! पण या वरून हे मात्र लक्षात येईल की पक्ष आणि त्याची आयाडोलोजी याच्याशी जनतेला विशेष देणे घेणे नाही. माझा प्रश्न सुटतो का?, तो सोडण्याची कुणात ताकद आहे का? या प्रश्नांची उत्तर ज्याच्यात मिळतील मग त्यालाच माझा पाठींबा. ही गोष्ट नवीन कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावी. इथून पुढे पक्ष श्रेष्ठी आणि वरिष्ठ यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कार्कर्ते जोडा, जनतेची कामे करा, पक्षाकडून उभे रहा की अपक्ष, सत्ता तुमचीच असेल; आणि हे सूत्र या वेळेस काही बंडखोरांच्या विजयाने/शक्ती प्रदर्शनाने निश्चित झाले आहे.
भाजप ने छान कामगिरी केली आणि शिवसेनेच्या जीवावर भाजप महाराष्ट्रात चालते हा धब्बा तरी दूर केला. सेनेपेक्षा जास्त [की सेनेने अपेक्षे पेक्षा कमी] जागा मिळवून आपल महाराष्ट्रातील अस्तित्व सिद्ध केल आहे. उद्धव ठाकरेंनी ग्रामीण महाराष्ट्रात जाऊन चंगली आंदोलन केली, त्याची फळ अहि दिसतीलच; पण या पराभवने त्यांनी खचून जाऊ नये [खाचाल तर सगळी आंदोलन सत्तेसाठी होती हा धब्बा लागेल आणि धब्बे पुसायला फार वेळ लागतो]. महाराष्ट्र, प्रश्न 'या ना त्या मार्गाने' [सत्तेतून किंवा बाहेरून] सोडवानारांच्या सदैव पाठीशी राहील, पण जनतेचा विश्वास कमवायला वेळ लागतो. तितकासा वेळ अजून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेला झालेला नाही, किंवा या आंदोलनांना तितका वेळ झालेला नाही आणि व्याप्ती ही आलेली नाही. अजून खूप काम करायचे आहे. शिवसेनेच्या वाटचालीला आमच्या शुभेच्छा आणि महाराष्ट्रात भाजप सोबत शिवसेना एक खंबीर विरोधी पक्ष, प्रगतीशील धोरणांना पाठींबा देणारा आणि जाचक धोरणांना त्याचा प्रखरतेने विरोध करणारा विरोधी पक्ष म्हणून काम करेल ही अपेक्षा.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर काही [सर्व नाही!] मित्र पक्ष/संघटना यांची ही कामगिरी त्यांची व्याप्ती बघता अभिनंदनाची पात्र ठरतात. त्यांचे अभिनंदन.
आता येणाऱ्या सरकारने आणि विरोधी पक्षाने आपले कर्तव्य चोख पणे पार पडावे हीच अपेक्षा ठेवून महाराष्ट्राच्या वाटचालीला शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!
[आता आपण हे नक्की वाचावे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...ही तर कुठे सुरवात ]
- प्रकाश पिंपळे आणि अमोल सुरोशे
[ टीप: शीर्षकातील 'दिल्या' हा शब्द आवर्जून वापरलेला आहे. लोक निवडून येत नसतात ते दिले जातात, लोक पडत नाहीत ते पाडले जातात आणि ते ही फक्त जनतेकडूनच, त्या मुळे ही कमावलेली जहागिरी नाही तर दिले गेलेले काम आहे]
बुधवार १४ ऑक्टोबर २००९
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त .... हि तर कुठे सुरुवात !
"शाळा सुटली पाटी फुटली" या उक्ती प्रमाणे गेले दोन एक महिने चालू असलेला निवडणुकांची धामधूम अखेर मतदान नंतर संपली. काही काळापर्यंत का होईना सर्वत्र एक शांतता असल्या सारखे सर्वांनाच वाटले.
या निवडणुकीच्या धुळवडी मध्ये मग करोडो रुपयांची झालेली उधळण, दारू च्या वाहणाऱ्या गंगा,पार्ट्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी .. याला काही काळापुरता का होईना एक अर्धविराम मिळाला.
कोणाला दिवसाढवळ्या सत्तेची स्वप्न पडत असतील तर आमचे काही नेते सत्ता जाण्याच्या भीतीने झोपेतून सुद्धा दचकून जागे होत असतील, पण ह्यांच्या नशिबी काय लिहिले आहे हे तर आमच्या एका दिवसाच्या राजाने म्हणजेच आमच्या मतदाराने ते वोटिंग मशीन मध्ये बंद करून ठेवले आहे. काही काळ का होईना आमचे हे नेते लोक सुखाने झोपू तरी नाही शकणार .. मग भले हि बाकी ५ वर्षे त्यांनी आमची झोप उडवलेली असो.
येणाऱ्या २२ तारखेला काय ते निश्चित कळेल, सत्तेची गणिते मांडली जातील, खुर्चीचा खेळ सुरु होईल. एरव्ही आमच्या शेतमालाला कधीच भाव नाही राहणार पण येणाऱ्या काळात बर्याच जणांचा भाव हा वधारलेला असेल. या निवडणुकीत झालेली बंडखोरी, युती आणि आघाडी मधील मतभेद , व्यायाक्तिक स्वरुपाची टीका टिपणी या मुळे निवडणुकीच्या आधीच येणाऱ्या मुख्य फिल्म चे ट्रेलर आपल्याला बघायला भेटले होते. असो जे झाले ते झाले.. आणि जे होणार आहे ते हि आता २२ तारखेलाच समजेल.
सध्या कोणी कौल दाखवतोय तर कोणी पोल दाखवतोय .. पण आपल्याला काय त्याचे, आम्ही मतदान केले .. म्हणजे आम्ही स्वतंत्र भारतचे जबाबदार नागरिक हि पदवी तर आम्हाला १३ तारखेलाच मिळाली. या पुढे सत्ता स्थापणारे सत्ता स्थापन करतील , विकले जाणारे विकले जातील, घोडे बाजार तेजीत चालेल, आणि पुन्हा मग तारेवरची कसरत करून कसे तरी कोणाचे सरकार स्थापन होईल. पण पुढे काय .. ये रे माझ्या मागल्या म्हणून आम्ही काय पुन्हा ५-५ वर्षांनी तेच करणार का.. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे, पण आमच्या देशामध्ये लोकशाही चा अर्थ म्हणजे केवळ निवडणुका म्हणून घेतला जातो. एकदा का निवडणुका झाल्या कि मग निवडून देणारे आणि निवडून येणारे दोघे हि दीर्घ झोपेत .. मग पुन्हा आम्ही ५ वर्षांनी एकदा जागे होतो .. व्यवस्थेला शिव्या घालतो .. आणि फार मोठ्या आविर्भावाने मतदान करून काही उपकार केल्या सारखे वागतो.. एवढ्या मोठ्या लोकशाही च्या देशामध्ये आम्हाला लोकशाही कधी कोणी शिकवलीच नाही .. लोक शाही म्हणजे निवडणुका.. मतदान एवढा सरळ अर्थ आम्ही घेऊन बसलो आणि तिथेच गेली ६० वर्षे आम्ही फसलो.
या देशाच्या निर्मिती मध्ये प्रत्येक भारतीयांचा सहभाग होता, त्याचेच ऋण म्हणून आमच्या त्या काळाच्या नेत्यांनी या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करून प्रत्येक भारतीयाला या शासन व्यवस्थे मध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये समाविष्ट करून घेतले, खरोखरच त्यांचे अनेक उपकार आहेत आमच्या वर, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते .. आम्हाला या लोकशाही चा सर्वात मोठा आधारस्तंभ बनवले खरे पण एवढा मोठा आधार आम्ही आमच्या खांद्यावर पेलायचा कसा हे मात्र आमच्या नंतरच्या नेत्यांनी आम्हाला जाणीवपूर्वक कळू दिले नाही.. आता हि तेच चालले आहे.
आमच्या देशामध्ये लोकशाही रुजली असे म्हणतात पण मला तरी तसे जाणवले नाही .. ६० वर्षे झाली आता नवीन पिढी येत आहे, या पिढीकडे समज आहे, काही करण्याची जिद्द आहे, सन २०२० पर्यंत आमचा देश जगातील सर्वात जास्त तरुण असलेला देश असणार आहे, म्हणजेच आमचा देश तरुण देश म्हणून ओळखला जाईल, मग आता आमचे हे कर्तव्य बनते कि या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात आमचा येणारा तरुण त्याला हि लोकशाही संपूर्ण समजली पाहिजे.
या देशाची संपूर्ण शासन व्यवस्था हि आम्हीच निर्माण केलेली असते, ज्या व्यवस्थेला आम्ही दोष देतो त्याचे आम्ही एक अविभाज्य घटक असतो, म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि बंधुता प्रस्थापित करायची असल्यास फ़क़्त मतदान करून हे कार्य होणार नाही तर लोकशाही म्हणजे रोज रोज घडणाऱ्या सर्व राजकीय तथा सामाजिक घडामोडींमध्ये आम्हा सामान्य माणसांचा सहभाग वाढवणे. आम्ही स्वतः बनवलेले कायदे आम्ही स्वतः पाळले पाहिजे त्याची योग्य अंमलबजावणी होते कि नाही ह्याची दक्षता हि आम्हालाच घ्यावी लागते, या देशाच्या व्यवस्थेमध्ये जिथे जिथे आपण बोट ठेवतो तिथे तिथे आपल्यालाच सुधार करावा लागतो अन्यथा तो करवून घ्यावा लागतो.
कदाचित हे करवून घेण्यासाठीच आम्ही मतदान करतो .. पण लोकशाहीचा व्यापक अर्थ आपण समजून घेणे खूप गरजेचे आहे, कारण या लोकशाही मध्ये अंतिमतः आपणच या सर्व गोष्टींना सर्वस्वी जबाबदार असणार आहोत.
येत्या २२ तारखेला कोणी हि निवडून येवो .. पण आपण ही सत्याची धरलेली कास.. बदलाची केलेली अपेक्षा कधी ही सोडता कामा नये. जो देश, जे राष्ट्र आम्हाला पोसते त्या राष्ट्रासाठी आम्ही आहोत तिथे, आहे त्या परिस्थती मध्ये आमची लोकशाही अजून बळकट केली पाहिजे. नेते फ़क़्त निवडणुकीच्या काळातच दिसतात म्हणणारे आम्ही .. आता आपणच हि परिस्थती बदलली पाहिजे. सरकार कोणाचे हि येवो.. तुमची-माझी आपल्या सर्वांची एकाच इच्छा आहे ती म्हणजे या महाराष्ट्राची प्रगती .. आणि ती होईल एवढी अपेक्षा न करता .. ती आपण करवून घ्यायची .. खुर्चीवर बसणारा कोणी हि असेल .. पण तो आमच्याशी बांधील आहे एवढे लक्षात ठेवायचे आणि विकास खेचून आणायचा.
जो उत्साह .. जी अपेक्षा निवडणुकीमध्ये आपण करतो तोच जोश किंबहुना त्या हि पेक्षा जास्त कर्तव्य आपले पुढील ५ वर्ष मध्ये असणार आहे,
शेवटी एकच सांगतो .. मला आणि तुम्हाला, कोणाला सत्ता द्यायची किंवा कोणाला द्यायची नाही हे महत्वाचे नाहीये, तर महत्वाचे आहे ते आपल्याशी निगडीत असलेले प्रश्न.. आणि ते सोडवण्यासाठी किंवा सोडवून घेण्यासाठी आम्ही आमच्या सरकारला प्रवृत्त करणार .. हि मनामध्ये कायम भावना.
शासन व्यवस्थे मध्ये आपला सहभाग वाढवणे, निर्णय प्रक्रिये मध्ये आपले संघटीत योगदान देणे , आणि आपल्याच साठी असलेली हि लोकशाही आपणच मजबूत करणे हि येणाऱ्या काळाची खरी गरज असणार आहे.
शेवटी .. ज्यांनी १३ तारखेला आपले मत देऊन या लढाई मध्ये आपला सहभाग नोंदवला आहे .. त्यांनी आणि इतर सर्वांनी येणाऱ्या हक्काच्या लढाई साठी तयार राहावे..
सध्या साठी जय महाराष्ट्र ....
अमोल सुरोशे
या निवडणुकीच्या धुळवडी मध्ये मग करोडो रुपयांची झालेली उधळण, दारू च्या वाहणाऱ्या गंगा,पार्ट्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी .. याला काही काळापुरता का होईना एक अर्धविराम मिळाला.
कोणाला दिवसाढवळ्या सत्तेची स्वप्न पडत असतील तर आमचे काही नेते सत्ता जाण्याच्या भीतीने झोपेतून सुद्धा दचकून जागे होत असतील, पण ह्यांच्या नशिबी काय लिहिले आहे हे तर आमच्या एका दिवसाच्या राजाने म्हणजेच आमच्या मतदाराने ते वोटिंग मशीन मध्ये बंद करून ठेवले आहे. काही काळ का होईना आमचे हे नेते लोक सुखाने झोपू तरी नाही शकणार .. मग भले हि बाकी ५ वर्षे त्यांनी आमची झोप उडवलेली असो.
येणाऱ्या २२ तारखेला काय ते निश्चित कळेल, सत्तेची गणिते मांडली जातील, खुर्चीचा खेळ सुरु होईल. एरव्ही आमच्या शेतमालाला कधीच भाव नाही राहणार पण येणाऱ्या काळात बर्याच जणांचा भाव हा वधारलेला असेल. या निवडणुकीत झालेली बंडखोरी, युती आणि आघाडी मधील मतभेद , व्यायाक्तिक स्वरुपाची टीका टिपणी या मुळे निवडणुकीच्या आधीच येणाऱ्या मुख्य फिल्म चे ट्रेलर आपल्याला बघायला भेटले होते. असो जे झाले ते झाले.. आणि जे होणार आहे ते हि आता २२ तारखेलाच समजेल.
सध्या कोणी कौल दाखवतोय तर कोणी पोल दाखवतोय .. पण आपल्याला काय त्याचे, आम्ही मतदान केले .. म्हणजे आम्ही स्वतंत्र भारतचे जबाबदार नागरिक हि पदवी तर आम्हाला १३ तारखेलाच मिळाली. या पुढे सत्ता स्थापणारे सत्ता स्थापन करतील , विकले जाणारे विकले जातील, घोडे बाजार तेजीत चालेल, आणि पुन्हा मग तारेवरची कसरत करून कसे तरी कोणाचे सरकार स्थापन होईल. पण पुढे काय .. ये रे माझ्या मागल्या म्हणून आम्ही काय पुन्हा ५-५ वर्षांनी तेच करणार का.. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे, पण आमच्या देशामध्ये लोकशाही चा अर्थ म्हणजे केवळ निवडणुका म्हणून घेतला जातो. एकदा का निवडणुका झाल्या कि मग निवडून देणारे आणि निवडून येणारे दोघे हि दीर्घ झोपेत .. मग पुन्हा आम्ही ५ वर्षांनी एकदा जागे होतो .. व्यवस्थेला शिव्या घालतो .. आणि फार मोठ्या आविर्भावाने मतदान करून काही उपकार केल्या सारखे वागतो.. एवढ्या मोठ्या लोकशाही च्या देशामध्ये आम्हाला लोकशाही कधी कोणी शिकवलीच नाही .. लोक शाही म्हणजे निवडणुका.. मतदान एवढा सरळ अर्थ आम्ही घेऊन बसलो आणि तिथेच गेली ६० वर्षे आम्ही फसलो.
या देशाच्या निर्मिती मध्ये प्रत्येक भारतीयांचा सहभाग होता, त्याचेच ऋण म्हणून आमच्या त्या काळाच्या नेत्यांनी या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करून प्रत्येक भारतीयाला या शासन व्यवस्थे मध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये समाविष्ट करून घेतले, खरोखरच त्यांचे अनेक उपकार आहेत आमच्या वर, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते .. आम्हाला या लोकशाही चा सर्वात मोठा आधारस्तंभ बनवले खरे पण एवढा मोठा आधार आम्ही आमच्या खांद्यावर पेलायचा कसा हे मात्र आमच्या नंतरच्या नेत्यांनी आम्हाला जाणीवपूर्वक कळू दिले नाही.. आता हि तेच चालले आहे.
आमच्या देशामध्ये लोकशाही रुजली असे म्हणतात पण मला तरी तसे जाणवले नाही .. ६० वर्षे झाली आता नवीन पिढी येत आहे, या पिढीकडे समज आहे, काही करण्याची जिद्द आहे, सन २०२० पर्यंत आमचा देश जगातील सर्वात जास्त तरुण असलेला देश असणार आहे, म्हणजेच आमचा देश तरुण देश म्हणून ओळखला जाईल, मग आता आमचे हे कर्तव्य बनते कि या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात आमचा येणारा तरुण त्याला हि लोकशाही संपूर्ण समजली पाहिजे.
या देशाची संपूर्ण शासन व्यवस्था हि आम्हीच निर्माण केलेली असते, ज्या व्यवस्थेला आम्ही दोष देतो त्याचे आम्ही एक अविभाज्य घटक असतो, म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि बंधुता प्रस्थापित करायची असल्यास फ़क़्त मतदान करून हे कार्य होणार नाही तर लोकशाही म्हणजे रोज रोज घडणाऱ्या सर्व राजकीय तथा सामाजिक घडामोडींमध्ये आम्हा सामान्य माणसांचा सहभाग वाढवणे. आम्ही स्वतः बनवलेले कायदे आम्ही स्वतः पाळले पाहिजे त्याची योग्य अंमलबजावणी होते कि नाही ह्याची दक्षता हि आम्हालाच घ्यावी लागते, या देशाच्या व्यवस्थेमध्ये जिथे जिथे आपण बोट ठेवतो तिथे तिथे आपल्यालाच सुधार करावा लागतो अन्यथा तो करवून घ्यावा लागतो.
कदाचित हे करवून घेण्यासाठीच आम्ही मतदान करतो .. पण लोकशाहीचा व्यापक अर्थ आपण समजून घेणे खूप गरजेचे आहे, कारण या लोकशाही मध्ये अंतिमतः आपणच या सर्व गोष्टींना सर्वस्वी जबाबदार असणार आहोत.
येत्या २२ तारखेला कोणी हि निवडून येवो .. पण आपण ही सत्याची धरलेली कास.. बदलाची केलेली अपेक्षा कधी ही सोडता कामा नये. जो देश, जे राष्ट्र आम्हाला पोसते त्या राष्ट्रासाठी आम्ही आहोत तिथे, आहे त्या परिस्थती मध्ये आमची लोकशाही अजून बळकट केली पाहिजे. नेते फ़क़्त निवडणुकीच्या काळातच दिसतात म्हणणारे आम्ही .. आता आपणच हि परिस्थती बदलली पाहिजे. सरकार कोणाचे हि येवो.. तुमची-माझी आपल्या सर्वांची एकाच इच्छा आहे ती म्हणजे या महाराष्ट्राची प्रगती .. आणि ती होईल एवढी अपेक्षा न करता .. ती आपण करवून घ्यायची .. खुर्चीवर बसणारा कोणी हि असेल .. पण तो आमच्याशी बांधील आहे एवढे लक्षात ठेवायचे आणि विकास खेचून आणायचा.
जो उत्साह .. जी अपेक्षा निवडणुकीमध्ये आपण करतो तोच जोश किंबहुना त्या हि पेक्षा जास्त कर्तव्य आपले पुढील ५ वर्ष मध्ये असणार आहे,
शेवटी एकच सांगतो .. मला आणि तुम्हाला, कोणाला सत्ता द्यायची किंवा कोणाला द्यायची नाही हे महत्वाचे नाहीये, तर महत्वाचे आहे ते आपल्याशी निगडीत असलेले प्रश्न.. आणि ते सोडवण्यासाठी किंवा सोडवून घेण्यासाठी आम्ही आमच्या सरकारला प्रवृत्त करणार .. हि मनामध्ये कायम भावना.
शासन व्यवस्थे मध्ये आपला सहभाग वाढवणे, निर्णय प्रक्रिये मध्ये आपले संघटीत योगदान देणे , आणि आपल्याच साठी असलेली हि लोकशाही आपणच मजबूत करणे हि येणाऱ्या काळाची खरी गरज असणार आहे.
शेवटी .. ज्यांनी १३ तारखेला आपले मत देऊन या लढाई मध्ये आपला सहभाग नोंदवला आहे .. त्यांनी आणि इतर सर्वांनी येणाऱ्या हक्काच्या लढाई साठी तयार राहावे..
सध्या साठी जय महाराष्ट्र ....
अमोल सुरोशे
लेबले:
vishansabha 2005,
महाराष्ट्र,
विधानसभा
सोमवार १२ ऑक्टोबर २००९
दिनांक १३ ओक्टोबर २००९, महाराष्ट्राचे पुढील ५ वर्षाचे भवितव्य ठरवणारी महत्वाची तारीख...

♫ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय !!!!! हे राज्य व्हावे ही ‘श्रीं’ची इच्छा हे तर आहेच पन आता हे राज्य व्हावं, हे माझ्या तमाम श्री, श्रीमती, राव, रंक, शेतकरी, शेतमजूर, दीन-दलित, भटके, स्त्रिया, तरुण, कामगार, कष्टकरी या सर्वाची इच्छा असली पाहिजे..
या राज्याचा एकेकाळचा राजा, मी शिवाजीराजे भोसले सांगतो,
कर्तव्यापासून दूर गेलात, तर तुमचा कडेलोट तुम्ही स्वत:च केलात म्हणून समजा! उद्याचा दिवस विसरु नका .. आणि मतदान करा.
दिनांक १३ ओक्टोबर २००९, महाराष्ट्राचे पुढील ५ वर्षाचे भवितव्य ठरवणारी महत्वाची तारीख...
होऊ दे जय महाराष्ट्राचा ..महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा ....
अमोल सुरोशेया राज्याचा एकेकाळचा राजा, मी शिवाजीराजे भोसले सांगतो,
कर्तव्यापासून दूर गेलात, तर तुमचा कडेलोट तुम्ही स्वत:च केलात म्हणून समजा! उद्याचा दिवस विसरु नका .. आणि मतदान करा.
दिनांक १३ ओक्टोबर २००९, महाराष्ट्राचे पुढील ५ वर्षाचे भवितव्य ठरवणारी महत्वाची तारीख...
होऊ दे जय महाराष्ट्राचा ..महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा ....
( आभार लोकसत्ता आणि गूगल इमेजेस )
रविवार ११ ऑक्टोबर २००९
पहाट एका निर्माणाची ....
दोन एक दिवसांपूर्वी "nirmaan" च्या संकेतस्थळाला भेट दिली, पहिल्या भेटीतच निर्माण बद्दलचे आकर्षण वाटले.
"निर्माण" हि आशी एक चळवळ आहे कि ज्याच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला एक आव्हान केले गेले आहे, आपल्या स्वत्वाचा शोध घेणे म्हणजेच निर्माण. माझा जन्म का झाला ? माझ्या आयुष्याचे ध्येय काय आहे ? वैगेरे प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हास प्रवृत्त करणारी संस्था म्हणजेच "निर्माण".
निर्माण बद्दल नंतर कधी सविस्तर लिहिलाच कारण मी हि या साठी आगदी नवखा आहे.
या निर्माण च्या अधिक माहिती साठी मी मुंबई मधीलच श्री उमेश खाडे यांना फोन केला असता त्यांनी मला शनिवारी म्हणजेच १० ऑक्टो। ला दुपारी २ वाजता एका कार्यक्रमास येण्यास निमंत्रण दिले. मी आणि प्रकाश नि "निर्माण" च्या उत्सुकतेपोटी क्षणाचाही विचार न करता या कार्यक्रमास जाण्याचे ठरवले.
या निर्माण च्या माध्यमातून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात माजी पोलीस आयुक्त सुरेश खोपडे यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चा सत्रामधे माननीय खोपडे सरांनी दोन विषयांवर सविस्तर पने आपले अनुभव सादर केले.
त्यातील पहिला अनुभव किंवा एक असा प्रयोग ज्याची दखल केवल महाराष्ट्रानेच नाही तर सबंध भारत देशाने घेतली, तो म्हणजे त्यांनी राबवलेला अभिनव असा भिवंडीचा प्रयोग म्हणजेच "मोहल्ला कमिटी" हि संकल्पना.
हा प्रयोग करतांना त्यांनी केलेल्या सखोल अभ्यासाचा आणि केलेल्या सर्व प्रयत्नांची माहिती उपस्थितांना करून दिली, दंगलीची नेहमी सांगितली जाणारी कारणे त्यांनी खोडून काढली, आणि एका शास्त्र शुद्ध पद्धतीने दंगलीचे प्रमुख कारण शोधले, आणि एकदा का मुळ रोग काय आहे हे कळल्यावर उपाय करणे सोपे जाते म्हणतात न त्याच प्रमाणे त्यांनी या समस्ये साठी अतिशय रामबन उपाय सुचविले,हिंदू-मुस्लीम ह्यांच्या मध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी, एकमेकांबाबत असलेल्या गैरसमजुती दूर व्हाव्यात या साठी मोहल्ला कमिटी च्या माध्यमातून त्यांनी अथक प्रयत्न केले.
भिवंडी देशातील अति संवेदनशील शहर, इथे स्वातंत्र्यानंतर भयानक स्वरूपाच्या ४ दंगली झाल्या , पण बाबरी मस्जिद तोडल्यानंतर देश भर उसळलेल्या भीषण दंगली मध्ये हेच भिवंडी शहर मात्र शांत होते, कारण माननीय खोपडे सरांनी अतिशय कठोर पाने राबवलेली "मोहल्ला कमिटी" हि संकल्पना. या मुळेहजारो जीव तर वाचलेच पण समाजामध्ये एक चांगले वातावरण कायन राखण्यात त्यांनी यश मिळवले, आपण म्हणतो न एक माणूस काय करू शकतो, खोपडे सरांनी ते दाखवून दिले आहे कि एक माणूस सद्य व्यवस्थे मध्ये राहून सुद्धा खूप काही करू शकतो, गरज असते ती प्रखर इच्छाशक्तीची.
त्यांनीच राबवलेल्या दुसऱ्या योजनेची देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे सबंध पारधी समाजाकडे बघण्याचा जो कायम दृष्टीकोन झालेला आहे आणि त्या मुळे निरपराध पारधी समाजाला मिळणारी सापत्न वागणूक या मुळे त्यांनी "पारधी पुनर्वसन प्रकल्प योजना" राबविली.
या योजनेच्या माध्यमातून विविध नवी पाऊले उचलून गावकरी आणि पारधी वस्तीचे तांडे यांच्यातील विकोपाला जाणारे वाद संपुष्टात आणले गेले, विविध पारधी समाजातील लोकांचा चाललेला छळ त्यांनी थांबवला, पारधी समाजातीलच काही लोक पोलिसांचे मुखबीर बनले आणि होणारे गुन्हे आधीच आटोक्यात येण्यासाठी त्यांची मदत होऊ लागली. विविध नवीन पाऊले उचलून हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविला आणि त्या जिल्ह्यातील होणारे गुन्ह्याचे प्रमाण कमी केले.
म्हणजेच आतिशय नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक संकल्पना त्यांनी नुसत्या मांडल्या नाहीत तर त्या त्यांनी यशस्वी करून दाखवल्या.
आपण नेहमी एका चौकटीची भाषा बोलतो,म्हणतो कि मला कसा हे जमेल .. मला या व्यवस्थेत राहून कस काय होईल ? पण या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणजे सुरेश खोपडे आणि त्यांनी त्याच चौकटीत राहून राबवलेले अभिनव उपक्रम.
या सर्व चर्चासत्र नंतर विविध प्रश्नांची सखोल उत्तरे सरांनी दिली, दत्ता भाऊंची मिश्कील उत्तरे देखील सोबतीला होती. अतिशय सुंदर असा संवाद चालला. प्रश्नांच्या फैरी आणि त्याला तेवढेच समाधानकारक उत्तर.
नक्कीच प्रत्येकाच्या मना मध्ये आपण हि काही करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि एक माणूस समाजातील अनेक प्रश्नांना कशी अभ्यासपूर्ण उत्तरे शोधू शकतो ह्याची पण प्रेरणा मिळाली. सामन्यातूनच असामान्य व्यक्तिमत्व उभे राहते इथे ह्याचा देखील प्रत्यय आला.
आपण नेहमी व्यवस्थेला दोष देत आसतोत, आणि बेह्मी एक प्रश्न आपल्या डोक्यात असतो कि
कोण बदलणार हे सगळ ?
सबंध चर्चे नंतर सर्व उपस्थित खालील काही प्रश्न स्वतः च्याच मनाशी बांधून घेऊन गेले असतील
If not you, Then who?
If not now, Then when ?
मला खात्री आहे खोपडे सरांच्या कार्यापसून प्रेरणा घेउन नक्कीच ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सर्व युवा वर्ग प्रयत्न करील .
या कार्यक्रमाच्या निमित्त्याने खूप चांगल्या लोकांची भेट झाली, विविध क्षेत्रातील तरुण - तरुणी वेगवेगळ्या विचारांनी भारलेली, पण एक सामाजिक बांधिलकी असणारी.
एका वैचारिक बैठकीची गरज सर्वांनाच हवी असते, निर्माण च्या माध्यमातून हि संधी सर्वांना प्राप्त झाली त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि विचारांची सुरु झालेली हि चळवळ नक्कीच येणाऱ्या काळात एका नवीन निर्माणाची पहाट आणल्या शिवाय राहणार नाही ह्याची मला खात्री आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा,
http://nirman.mkcl.org/
http://sureshkhopade.com/index.html
लवकरच अधिक माहिती आणि नवीन उपक्रमांबद्दल माहिती घेऊन येईलच, तो पर्यंत
जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे
"निर्माण" हि आशी एक चळवळ आहे कि ज्याच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला एक आव्हान केले गेले आहे, आपल्या स्वत्वाचा शोध घेणे म्हणजेच निर्माण. माझा जन्म का झाला ? माझ्या आयुष्याचे ध्येय काय आहे ? वैगेरे प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हास प्रवृत्त करणारी संस्था म्हणजेच "निर्माण".
निर्माण बद्दल नंतर कधी सविस्तर लिहिलाच कारण मी हि या साठी आगदी नवखा आहे.
या निर्माण च्या अधिक माहिती साठी मी मुंबई मधीलच श्री उमेश खाडे यांना फोन केला असता त्यांनी मला शनिवारी म्हणजेच १० ऑक्टो। ला दुपारी २ वाजता एका कार्यक्रमास येण्यास निमंत्रण दिले. मी आणि प्रकाश नि "निर्माण" च्या उत्सुकतेपोटी क्षणाचाही विचार न करता या कार्यक्रमास जाण्याचे ठरवले.
या निर्माण च्या माध्यमातून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात माजी पोलीस आयुक्त सुरेश खोपडे यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चा सत्रामधे माननीय खोपडे सरांनी दोन विषयांवर सविस्तर पने आपले अनुभव सादर केले.
त्यातील पहिला अनुभव किंवा एक असा प्रयोग ज्याची दखल केवल महाराष्ट्रानेच नाही तर सबंध भारत देशाने घेतली, तो म्हणजे त्यांनी राबवलेला अभिनव असा भिवंडीचा प्रयोग म्हणजेच "मोहल्ला कमिटी" हि संकल्पना.
हा प्रयोग करतांना त्यांनी केलेल्या सखोल अभ्यासाचा आणि केलेल्या सर्व प्रयत्नांची माहिती उपस्थितांना करून दिली, दंगलीची नेहमी सांगितली जाणारी कारणे त्यांनी खोडून काढली, आणि एका शास्त्र शुद्ध पद्धतीने दंगलीचे प्रमुख कारण शोधले, आणि एकदा का मुळ रोग काय आहे हे कळल्यावर उपाय करणे सोपे जाते म्हणतात न त्याच प्रमाणे त्यांनी या समस्ये साठी अतिशय रामबन उपाय सुचविले,हिंदू-मुस्लीम ह्यांच्या मध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी, एकमेकांबाबत असलेल्या गैरसमजुती दूर व्हाव्यात या साठी मोहल्ला कमिटी च्या माध्यमातून त्यांनी अथक प्रयत्न केले.
भिवंडी देशातील अति संवेदनशील शहर, इथे स्वातंत्र्यानंतर भयानक स्वरूपाच्या ४ दंगली झाल्या , पण बाबरी मस्जिद तोडल्यानंतर देश भर उसळलेल्या भीषण दंगली मध्ये हेच भिवंडी शहर मात्र शांत होते, कारण माननीय खोपडे सरांनी अतिशय कठोर पाने राबवलेली "मोहल्ला कमिटी" हि संकल्पना. या मुळेहजारो जीव तर वाचलेच पण समाजामध्ये एक चांगले वातावरण कायन राखण्यात त्यांनी यश मिळवले, आपण म्हणतो न एक माणूस काय करू शकतो, खोपडे सरांनी ते दाखवून दिले आहे कि एक माणूस सद्य व्यवस्थे मध्ये राहून सुद्धा खूप काही करू शकतो, गरज असते ती प्रखर इच्छाशक्तीची.
त्यांनीच राबवलेल्या दुसऱ्या योजनेची देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे सबंध पारधी समाजाकडे बघण्याचा जो कायम दृष्टीकोन झालेला आहे आणि त्या मुळे निरपराध पारधी समाजाला मिळणारी सापत्न वागणूक या मुळे त्यांनी "पारधी पुनर्वसन प्रकल्प योजना" राबविली.
या योजनेच्या माध्यमातून विविध नवी पाऊले उचलून गावकरी आणि पारधी वस्तीचे तांडे यांच्यातील विकोपाला जाणारे वाद संपुष्टात आणले गेले, विविध पारधी समाजातील लोकांचा चाललेला छळ त्यांनी थांबवला, पारधी समाजातीलच काही लोक पोलिसांचे मुखबीर बनले आणि होणारे गुन्हे आधीच आटोक्यात येण्यासाठी त्यांची मदत होऊ लागली. विविध नवीन पाऊले उचलून हा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखविला आणि त्या जिल्ह्यातील होणारे गुन्ह्याचे प्रमाण कमी केले.
म्हणजेच आतिशय नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक संकल्पना त्यांनी नुसत्या मांडल्या नाहीत तर त्या त्यांनी यशस्वी करून दाखवल्या.
आपण नेहमी एका चौकटीची भाषा बोलतो,म्हणतो कि मला कसा हे जमेल .. मला या व्यवस्थेत राहून कस काय होईल ? पण या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणजे सुरेश खोपडे आणि त्यांनी त्याच चौकटीत राहून राबवलेले अभिनव उपक्रम.
या सर्व चर्चासत्र नंतर विविध प्रश्नांची सखोल उत्तरे सरांनी दिली, दत्ता भाऊंची मिश्कील उत्तरे देखील सोबतीला होती. अतिशय सुंदर असा संवाद चालला. प्रश्नांच्या फैरी आणि त्याला तेवढेच समाधानकारक उत्तर.
नक्कीच प्रत्येकाच्या मना मध्ये आपण हि काही करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झाला. आणि एक माणूस समाजातील अनेक प्रश्नांना कशी अभ्यासपूर्ण उत्तरे शोधू शकतो ह्याची पण प्रेरणा मिळाली. सामन्यातूनच असामान्य व्यक्तिमत्व उभे राहते इथे ह्याचा देखील प्रत्यय आला.
आपण नेहमी व्यवस्थेला दोष देत आसतोत, आणि बेह्मी एक प्रश्न आपल्या डोक्यात असतो कि
कोण बदलणार हे सगळ ?
सबंध चर्चे नंतर सर्व उपस्थित खालील काही प्रश्न स्वतः च्याच मनाशी बांधून घेऊन गेले असतील
If not you, Then who?
If not now, Then when ?
मला खात्री आहे खोपडे सरांच्या कार्यापसून प्रेरणा घेउन नक्कीच ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सर्व युवा वर्ग प्रयत्न करील .
या कार्यक्रमाच्या निमित्त्याने खूप चांगल्या लोकांची भेट झाली, विविध क्षेत्रातील तरुण - तरुणी वेगवेगळ्या विचारांनी भारलेली, पण एक सामाजिक बांधिलकी असणारी.
एका वैचारिक बैठकीची गरज सर्वांनाच हवी असते, निर्माण च्या माध्यमातून हि संधी सर्वांना प्राप्त झाली त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि विचारांची सुरु झालेली हि चळवळ नक्कीच येणाऱ्या काळात एका नवीन निर्माणाची पहाट आणल्या शिवाय राहणार नाही ह्याची मला खात्री आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक्स वर क्लिक करा,
http://nirman.mkcl.org/
http://sureshkhopade.com/index.html
लवकरच अधिक माहिती आणि नवीन उपक्रमांबद्दल माहिती घेऊन येईलच, तो पर्यंत
जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे


